जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावाच मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राज्यभरात मराठा आंदोलन उग्र होत असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जालन्यातही इंटरनेट बंद करण्यात आलं यामुळे जरांगे पाटील यांच्याजवळ १५ हजार नागरिक जमले आणि त्यांनी इंटरनेट सुरू करण्याची मागणी केली.